. एकदा साताऱ्यात आणि मुंबईत खूप मोठा भुकंप आला
कबू चं आणि माझं घर तुटलं
मग आम्ही पुण्यात घर बांधलं
आत्या घर शोधत होती
तेंव्हा आत्याचा एक ड्रायव्हर होता
तो म्हणाला तुम्ही घर शोधा
तोपर्यंत मी बाळाला माझ्या गावी नेतो
कबू गेला नगरला
मग आत्याने पुण्यात घर घेतलं
पण ती विसरली
कबू कोणत्या गावी गेला
मग आम्ही ड्रायवर ला फोन केला
मग आम्हाला कळलं की तो नगरला आहे .
मी आणि आजोबा सायकलवरून गेलो .
ड्रायवरच्या झोपडीजवळ पोचल्यावर
मला तिथे हसतमुखत खेळणारा कबू दिसला
तेवढयात आजोबानी वाघाची डरकाळी ऐकली
मग आम्ही परतलो .
आल्यावर मी रडतच बसले
मला वाटलं वाघ आला
आता कबू चं काय होणार ?
म्हणून मी आणि आजोबा दुसऱ्या दिवशी गेलों
जवळ आल्यावर सायकलची चेन निघाली
तेवढयात
कबू दिद्दी ! करत पळत आला
आणि आम्ही घरी परतलो
नंतर ड्रायवरच आला
आणि म्हणाला
तुमचे बाळ आमच्याकडून हरवलं
मग आत्यानं ड्रायवर ला सांगितलं
की असं सगळं घडलं आहे .
आणि हे सगळं कधी घडलं ?
स्वप्नात ...
इरा मंडपे